गजानन गव्हाणे पाटील
लोणीकंद, ता. हवेली येथील श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाच्या परंपरेनुसार विशिष्ठ संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. या मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यावर भर देण्यात येतो.
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली निलेश चाकणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपला मुलगा इंजिनीयर डॉक्टर वकील झाला पाहिजे ते पूर्ण करण्यासाठी ते अपार कष्ट घेत असतात. आपले स्वप्न पूर्ण झाले नसतील तरी आपल्या मुलाने हे स्वप्न पूर्ण करावी अशी त्यांची इच्छा असते, आणि हे ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण या महाविद्यालयात घेत आहे यामध्ये या महाविद्यालयाचे खरे यश आहे. या महाविद्यालयाचे हे विद्यार्थी गरुड झेप घेवून महाविद्यालयाचे नाव मोठे करतील अशी भावना या प्रसंगी व्यक्त केली.

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर मैदानी खेळ स्पर्धेत भाग घेणे व व्यवहारी ज्ञान घेतलेच पाहिजे त्याचबरोबर त्यांनी भूमकर परिवाराचे ही कौतुक केले की ग्रामीण भागात असे सुसज्ज महाविद्यालय उभे केले व त्याचा ग्रामीण भागातील मुलांना उपयोग होत आहे.
या कार्यक्रम प्रसंगी रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सुभाष इंद्रभान लोणकर (आदर्श सरपंच ) यांचा ग्रामीण भागातील कार्यबदल सत्कार करण्यात आला तसेच अशोक रामचंद्र बारवकर यांचा उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल, प्राची रुपेश जाधव (नगरविकास सहाय्यक आयुक्त) यांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल तर विजय राजाभाऊ भुजबळ यांचा उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला. विद्यार्थीचा राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर व विद्यापीठ स्तरावर उल्लेखनीय कामगीरी केलेल्या विद्यार्थीचा पारीतोषिक देवून गुणगौरव करण्यात आला.

श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव शंकर रामचंद्र भूमकर यांनी विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करताना मुलांनी चांगल्या प्रकारे अभ्यास करून महाविद्यालयाचे नाव मोठे केले पाहिजे. शिक्षकांनी ग्रामीण भागातील मुलांना प्रोसाहित करून यशस्वी कसे होतील या कडे लक्ष्य दिले पाहिजे. ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक अडचणी येऊ नये मनून त्यांनी श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयाची स्थापना केली.
या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा प्रसंगी श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार उद्धव रामचंद्र भूमकर, रुपाली शंकर भूमकर, लक्ष्मी उद्धव भूमकर, स्वप्नाली संजय भुजबळ, वासुदेव कचरे, अशोक रामचंद्र बारवकर (उद्योजक), सुभाष इंद्रभान लोणकर (आदर्श सरपंच), प्राची रुपेश जाधव (नगरविकास सहाय्यक आयुक्त), विजय राजाभाऊ भुजबळ (उद्योजक), संजय राजाभाऊ भुजबळ (उद्योजक), इंद्रजीत सतीश बारवकर (उद्योजक), संदेश रवींद्र लोणकर (उद्योजक), संकेत विजय सायकर (उद्योजक) व श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे टेक्निकल डायरेक्टर सिद्धांत शंकर भूमकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
श्री रामचंद्र अभियांत्रिकी व डिप्लोमा महाविद्यालयचे प्राचार्य डॉ. अविनाश देसाई यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व आभार मानले. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ सुषमा तायडे, प्रा. डॉ सागर शिंदे, प्रा. विकास गायकवाड, प्रा. भीमराव बोरुडे, प्रा. डॉ. नीलम कुमार, प्रा डॉ वैशाली तुराई, प्रा दीपाली होडाडे, प्रा आकाश चौरे, प्रा बोलाडे , प्रा गुणावरे, प्रा पटेल मॅडम व अनिल जमदाडे तसेच शिक्षकांनी व विध्यार्थ्यांनी यशस्वीपणे केले.





